अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक वर्षाची मुदत दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही मुदत अंतिम असल्याचे संकेत देत, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास जुजबी मराठी शिकणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली आहे. या काळात त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्याचबरोबर MPSC परीक्षांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी समिती नेमल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली.
रायगड जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अनिकेत तटकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यातील शाब्दिक संघर्ष चांगलाच पेटला आहे. अनिकेत तटकरेंवर टीका करताना दळवींनी त्यांचा ‘सरोगसी बाळ’ असा उल्लेख केला असून, विधानपरिषदेची निवडणूक लढवली असती तर तटकरे राजकारणात आलेच नसते, असा दावा केला आहे.
रुपाली चाकणकर यांच्या कल्याणीनगर येथील ‘द नाईन्स’ बार अँड रेस्टॉरंटवर काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी आर्थिक प्रश्न उपस्थित केले आहेत. सुमारे 20 हजार चौरस फुटांच्या या रेस्टॉरंटची कथित किंमत 35 कोटी रुपये असल्याचा दावा करत तिवारी यांनी 'एवढा पैसा कुठून आला', असा सवाल केला आहे. मात्र, तिवारी यांनी केलेल्या दाव्यांना अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. या आरोपांवर रुपाली चाकणकर यांची भूमिका समोर आल्यानंतर अधिक स्पष्टता होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात राहुल गांधी यांनी ‘Smash the Patriarchy’चा नारा दिल्यानंतर भाजप खासदार बांसुरी स्वराज यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. महिलांशी संबंधित वादग्रस्त वक्तव्यांवर राहुल गांधींच्या मौनाचा दाखला देत, काँग्रेसच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर मोठे आश्वासन दिले आहे. कृष्णा नदीच्या पुराचे अतिरिक्त पाणी उजनी धरणात आणून धाराशिव आणि बीड जिल्ह्यांना देण्याची योजना राबवली जाणार आहे. यंदा दुष्काळाची शक्यता लक्षात घेऊन तातडीच्या उपाययोजनांसह मराठवाड्याचा पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांना दिले. बैठकीत विविध मतदारसंघांतील विकासकामे आणि समस्यांवरही चर्चा झाली.
राज्यात बाईक टॅक्सीला परवानगी देण्याच्या निर्णयावरून रिक्षाचालकांच्या रोजगाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या निर्णयावर टीका करत काही मंत्र्यांचे बाईक टॅक्सी कंपन्यांशी आर्थिक संबंध असल्याचा आरोप केला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ठोस पुरावे सादरण्याचे आव्हान दिले असून, रिक्षाचालकांच्या प्रश्नावर ‘सामना’ कार्यालयात प्रत्यक्ष चर्चेसाठी तयार असल्याचे म्हटले आहे.
कांदिवली पश्चिमेत मराठी भाषेच्या सक्तीविरोधात अमराठी रिक्षाचालकांनी केलेल्या चक्का जाम आंदोलनानंतर वातावरण तापलं आहे. आंदोलनादरम्यान दगडफेक आणि मराठी रिक्षाचालकावर हल्ल्याचा आरोप झाल्यानंतर मनसेने आक्रमक भूमिका घेत हिंदुस्तान नाका परिसरात थेट इशारा देणारा फलक लावला आहे.
रुपाली चाकणकर यांच्याबाबत सोशल मीडियावर खोटी, अश्लील आणि बदनामीकारक माहिती प्रसारित केल्याचा आरोप करत त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्यूब आणि ट्विटरवरील काही अकाउंट्सचा तक्रारीत उल्लेख असून, पुणे पोलिसांनी 21 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण, महसूल व वन आणि विधि व न्याय विभागाशी संबंधित चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. अहिल्यानगर येथे डॉ. बाळासाहेब विखे पाटील खासगी आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडू व त्यांच्या मार्गदर्शकांसाठीच्या रोख बक्षीस धोरणातही सुधारणा करण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरून राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता आहे. ज्या मराठा बांधवांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्यात जाणूनबुजून टाळाटाळ होत असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, 29 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी 58 लाख नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया थांबवू नये, अशी मागणी केली आहे.
मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून उपोषणावर ठाम असून सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकीत 58 लाख कुणबी नोंदी, प्रमाणपत्रे रद्द करण्याचा मुद्दा आणि मराठा आरक्षणावरून सरकारला सवाल केला. अंतरवाली सराटीतील चर्चेत जरांगे आक्रमक झाले.
साखरेच्या वाढत्या दरावरून माजी मंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून साखरेचे भाव निम्म्यावर आणण्याची आणि सरकारचा महसूल वाढवण्यासाठी दारूचे दर दहापट वाढवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, साखरेच्या दरवाढीमागे घटलेला साठा आणि देशांतर्गत पुरवठ्याचा ताण ही कारणे सांगितली जात आहेत. सरकारच्या १० लाख टन कच्ची साखर आयात करण्याच्या निर्णयामुळे दर कमी होणार का, याकडे लक्ष लागले आहे.
राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर असून ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमातून महाराष्ट्रातील तरुणांशी संवाद साधणार आहेत. त्याआधी झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत पुण्यातील विद्यार्थ्यांच्या घटनेपासून राज्यातील राजकीय परिस्थितीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींनी नेत्यांना धमक्यांना न घाबरता लढत राहण्याचा संदेश दिल्याचे सांगितले. दरम्यान, ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत संघटना मजबूत करण्यासह युवकांना पक्षाशी जोडण्यावर भर देण्यात आला. पदाधिकाऱ्यांना ‘राष्ट्र प्रथम’चा मंत्र देताना सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळण्याचे निर्देश देण्यात आले. विरोधकांना तथ्यांच्या आधारे उत्तर देण्याचा सल्लाही देण्यात आला.
शक्तिपीठ महामार्गाविरोधात सांगलीत २१ ऑगस्ट रोजी विराट मोर्चा काढण्यात आला. यावेळी जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधत “शक्तिपीठासाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू” असा इशारा दिला. सतेज पाटील, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व महिला मोर्चात सहभागी झाले. सरकारने महामार्गाच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि सत्ताधारी आमदार-खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी करण्यात आली.
मुंबईतील विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर सदस्य नोंदणी मोहिमेवरून मनसे विद्यार्थी सेना आणि ABVP कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला निर्णायक वळण मिळालं आहे. ठाकरे गटाने केवळ आमदारांच्या संख्येच्या आधारे शिंदे गटाला मूळ शिवसेना मानता येणार नाही, असा जोरदार युक्तिवाद केला. त्याचवेळी, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय चुकीचा ठरल्यास न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकते का, तसेच शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न न्यायालय स्वतः हाताळू शकते का, यावरही खडाजंगी झाली. दरम्यान, शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह ठाकरे गटाला द्यावे; अन्यथा चिन्ह गोठवावे, अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली.
राहुल गांधी 22 ऑगस्टला पुण्यात ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थिनींशी संवाद साधणार आहेत. मात्र, पुणे पोलिसांनी 18 ते 31 ऑगस्टदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू केल्याने कार्यक्रमावर निर्बंधांचं सावट आहे. या निर्णयावर काँग्रेसने आक्षेप घेत प्रशासनावर कार्यक्रम रोखण्याचा आरोप केला असून, गरज पडल्यास न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा एकदा प्रकृती बिघडली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील रुग्णालयातून कालच डिस्चार्ज मिळाल्यानंतर आज त्यांना ताप आणि अशक्तपणा जाणवू लागला. त्यामुळे अंतरवाली सराटी येथे त्यांच्यावर सलाईनद्वारे उपचार सुरू करण्यात आले असून, प्रस्तावित मराठवाडा दौराही रद्द करण्यात आला आहे.
नितीन देसाईंच्या N.D. स्टुडिओची मालकी महाराष्ट्र सरकारकडे आली असून आशिष शेलार यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. 31 मार्च 2027 पर्यंत शूटिंग आणि इतर सुविधांवर 50% सवलत देण्यात येणार आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या जुन्या चर्चेचा खुलासा करताना एकनाथ शिंदे यांच्यासोबतही चर्चा झाल्याचं मान्य केलं आहे. मात्र शिंदेंसोबत नेमकी काय चर्चा झाली, हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. मुंडेंनी काँग्रेस प्रवेश का नाकारला, याबाबतही चव्हाण यांनी महत्त्वाचा दावा केला.
पुणे शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर मात करण्यासाठी पुढील दोन वर्षांत सुमारे 60 हजार कोटी रुपयांच्या विविध रस्ते प्रकल्पांवर काम केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. पुणे-छत्रपती संभाजीनगर प्रवास दोन तासांत पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, पुढे नागपूरपर्यंतचा प्रवासही अधिक वेगवान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा रखडलेला तिढा अखेर सुटला असून रायगडची जबाबदारी भरत गोगावले, तर नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे कायम ठेवण्यात आलं आहे. या निर्णयानंतर भाजपकडून जल्लोषाची तयारी सुरू असतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाजन आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “निर्लज्ज लोक आहेत… अकलेचा दुष्काळ आहे,” अशा शब्दांत राऊतांनी निशाणा साधला.