साखरेच्या दरात महिनाभरात तब्बल 29 टक्क्यांनी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. वाढत्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने 10 लाख टन कच्ची साखर आयात करण्यास परवानगी दिली असून, साठेबाजी रोखण्यासाठी आयात केलेल्या कच्च्या साखरेवर दोन महिन्यांच्या आत प्रक्रिया करून ती बाजारात विकणे बंधनकारक केले आहे.
महाराष्ट्रात दररोज तब्बल 40 ते 50 लाख लिटर खाद्यतेलाचा वापर होतो. यामध्ये सोयाबीन तेलाची मागणी सर्वाधिक असून पाम, सूर्यफूल आणि शेंगदाणा तेलाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. सणासुदीच्या काळात वाढती मागणी आणि सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवरील बंदीमुळे व्यापारी आणि ग्राहकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
चाकण MIDCमधील रस्ते, ड्रेनेज, वाहतूक कोंडी आणि इतर पायाभूत सुविधांच्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चाकणच्या धर्तीवर रांजणगाव, शेंद्रा, वाळूज, तळेगाव आणि बिडकीनसह राज्यातील महत्त्वाच्या MIDCमध्ये टप्प्याटप्प्याने Industrial Township Act लागू करण्याचा विचार आहे.
चाकण एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक, ड्रेनेज, वीज आणि नागरी सुविधांच्या समस्यांनंतर राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. चाकणच्या धर्तीवर राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये टप्प्याटप्प्याने इंडस्ट्रिअल टाऊनशिप ॲक्ट लागू करण्याचा विचार सुरू आहे. रांजणगाव, शेंद्रा, वाळूज, तळेगाव आणि बिडकीन यांसारख्या औद्योगिक क्षेत्रांचाही या योजनेत समावेश होण्याची शक्यता आहे.
“पुण्यात घरांच्या विक्रीत 7% वाढ; तीन वर्षांच्या घसरणीनंतर रिअल इस्टेट बाजारात सुधारणा मात्र, नवीन प्रकल्पांचा वाढता पुरवठा आणि मागणीतील तफावत यामुळे न विकलेल्या घरांचा साठा विक्रमी ₹92,110 कोटींवर पोहोचला आहे.
केतन अग्रवाल हत्याकांडातील मुख्य आरोपी सिया गोयलच्या वडिलांच्या पुण्यातील 'मेसर्स बी. जी. गोयल अँड कंपनी' या दुकानावर FDAने धडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्याने 'स्टॉप बिझनेस नोटीस' बजावण्यात आली असून ८.१४ लाख रुपये किमतीचा ४,१७२ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला आहे. मात्र, ही कारवाई अन्न सुरक्षा नियमांअंतर्गत करण्यात आली असून तिचा केतन अग्रवाल हत्याकांडाच्या तपासाशी थेट संबंध नसल्याचे FDAने स्पष्ट केले आहे.